अंबड: गोदावरी आटल्याने अंबड-घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी
Ambad, Jalna | May 5, 2026 गोदावरी आटल्याने अंबड-घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी अंबड (प्रतिनिधी) : गोदावरी नदी पूर्णपणे आटल्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून पशुधनालाही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा फटका शेती व पिकांनाही बसत असून शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना राज्य विस्तारक तथा श