जळगाव: पाळधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्ग दोन महिन्यात वाहतूकीसाठी खुला होणार-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव शहराबाहेरून जाणारा पाळधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. रविवारी ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत या कामाची पाहणी केली. उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले.