भोकरदन: जालना राजुर महामार्गावर केदरखेडा गावाजवळ बस व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकी वरील 2 जण ठार
आज दिनांक 25 जुलै २०२५ वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावाजवळ जालना राजुर महामार्गावर बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे,यामध्ये दुचाकी वर असलेले दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अपघात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारात झाला, ज्यावेळी रिमझिम पाऊस सुरू असताना सदरचा अपघात झाला आहे, अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,मात्र मयताची नावे अद्याप कळू शकलेली नाही.