समुद्रपूर: गिरड (पेठ) शिवारात वास्तव्यास असलेल्या वाघाला हाकलून लावण्यासाठी वनविभागाचे सर्च ऑपरेशन
गिरड परीसरात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वाघ व वाघीणीसह तिन पिल्याच्या मुक्त संचार तसेच एकापाठोपाठ एक असे जनावरांवरावर हल्ले होत आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व शेतमजूर शेतात जायला घाबरत आहे.गिरड (पेठ) शिवारात आतापर्यंत ३ जनावरांचे बळी घेत येथिल नाल्यात झुडपात वास्तव्यास असलेल्या वाघाला हाकलून लावण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.