समुद्रपूर: गिरड परीसरात वाघाचे जनावरांवरील वाढते हल्ले लक्षात घेता सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार यांच्याकडून पाहणी
गिरड परीसरात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वाघ व वाघीणीसह तिन पिल्याच्या मुक्त संचार तसेच एकापाठोपाठ एक असे जनावरांवर होत आहे.आतापर्यंत या वाघाच्या हल्लात ८ जनावरांचा बळी गेला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व शेतमजूर शेतात जायला घाबरत आहे.हि परीस्थितीत लक्षात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी गिरड परीसरात येऊन वाघाच्या हल्लात ठार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली.