मिर्झांच्या सामाजिक सौहार्दाच्या शिकवणीला समाजात रुजवू या ! 'हास्यसम्राट 'च्या शेकडो आठवणींने श्रद्धांजली सभेत हसू आणि रडू अमरावती दि ३० :महाराष्ट्राचे हास्य सम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या काव्य प्रतिभेच्या ५० वर्षाच्या सिंचनातून निर्माण केलेल्या सामाजिक सौहार्दाला समाजात आणखीन घट्ट करण्यासाठी वचनबद्ध असू या ! असा सूर त्यांच्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी आज व्यक्त केला.हास्य सम्राटाला श्रद्धांजली व्यक्त करताना हास्य व्यंगाची फोडणी देण्यात आली.