मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संजना जाधव यांनी आज दि २६ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा देण्याची मागणी केली.त्यांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता देऊन किमान वेतन लागू करावे, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. ग्रामपंचायत कार्यालयातील डिजिटल कामकाजाची सर्व जबाबदारी परिचालकांवर असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.