रायगड जिल्ह्यात निवडून आलेल्या जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी आवाहन केलं आहे. विजयी मिरवणूक किंवा तुमचा आनंद जल्लोष साजरा करत असताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. शांततेचा भंग आणि भयसुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मात्र कोणी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना सोडले जाणार नाही अशी तंबी रायगडच्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात त्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे.