नागपूर शहर: दत्ताभाऊंच्या केंद्रस्थानी कायम सर्वसामान्य माणूसच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
"स्वर्गीय दत्ता मेघे हे केवळ जनसामान्यांचे नेते नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने 'दाता'भाऊ होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस आणि समाजातील वंचित घटक नेहमीच केंद्रस्थानी राहिले. आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात त्यांनी उभी केलेली व्यवस्था ही सामान्यांच्या कल्याणासाठीच होती," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.