वाढत्या शहरीकरणामुळे पूर्वी शहराबाहेर असलेल्या लातूर येथील सहकारी औद्योगिक वसाहत आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येऊन ठेपली आहे. परिणामतः येथील अनेक प्लॉटधारकांनी त्यांच्या प्लॉटचा वापर बदलला असून, नागरिकांना आणि उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन औद्योगिक वसाहतींसाठी नवीन धोरण आखण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत व्यक्त केले.