संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला . या पावसाच्या तडाख्यामुळे रोहा तालुक्यातील चिंचोली तर्फे अतोंने ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची वाडी ( वडाची वाडी ) येथील राजेश गोपीनाथ जाधव यांचे घर पूर्णतः कोसळले हि घटना 18 जून रोजी रात्री १२ वाजता घडली असून घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला आहे . यामध्ये एक बाईक व अन्य साहित्य आहे. रात्रीच्या मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन घरात राहत असलेले इतर ५ लोक बाजूच्या घरात गेल्यामुळे त्यांचे जिव वाचले आहे .