अंबरनाथ: बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण
बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले असल्याची माहिती शासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले असे प्रतिपादन फडणवीस यांनी केलं.