विविध बँकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या आरोपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश केशवराव भोसले यांनी सोमवारी नाचनवेल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केले. किरकोळ कारणांवरून खाती गोठवणे, थकीत कर्जापोटी पिकांचे पैसे अडवणे तसेच पीएम किसान व शासकीय अनुदान रकमेच्या वाटपात होणारी अडवणूक थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे. गोठवलेली खाती तत्काळ सुरू करावीत, पीक कर्ज खाते होल्ड करू नये व जामीनदारांचे पैसे रोखू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले