उमरखेड: पोफाळी येथे शॉर्टसर्किटमुळे चार एकर मधील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पोफाळी येथील शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस आगीत जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली.या आगीमध्ये शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखाचे नुकसान झाले.याप्रकरणी शेतकरी दीपक कवाने यांनी पोफाळी स्टेशनला तक्रार दाखल केली.