सिल्लोड शहरातील दुकानदारांनी अब्दुल सत्तार यांच्या पत्नीच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन तास दुकाने बंद ठेवायला हवी होती, अशी खंत कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी आज दि १७ फेब्रुवारी रोजीसांय ६ वा केली.दुःखवट्याचा मान राखला गेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या वक्तव्यामुळे सिल्लोड परिसरात चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान, या प्रकरणावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.