रब्बी हंगामात पिकांना सर्वाधिक पाणी लागण्याचा काळ, पण याच निर्णायक टप्प्यावर शेती पंपाची वीज खडी क्रशरकडे वळवल्याचा आरोप करत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात भावेनगर परिसरात शेतकरी संतप्त झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरून त्यांनी खडी वाहतूक करणारे डंपर रोखले आणि महावितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला. भावेनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी क्रशर चालतात.