उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील कच्चं मडकं असल्याची खोचक टीका राऊतांनी केली. काल त्यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला होता. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. फडणवीस हेच शिंदेंना गोत्यात आणत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत