आज दि २ मार्च रोजी सांयकाळी ७ वाजता मिळालेली माहिती अशी कि कन्नड येथील भूमि अभिलेख कार्यालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत किसान सभेचे बापू गवळी यांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. संबंधित मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली. प्रशासनानेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.