लातूर : “भारत इथेनॉल निर्मितीत पॉवरहाऊस बनत आहे. पण यशाचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा,” असे मत माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.चालू वर्षी देशात तब्बल १७०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले असून सरकारची मागणी केवळ १००० कोटी लिटर इतकी आहे. उर्वरित ७०० कोटी लिटर इथेनॉलचे भवितव्य अनिश्चित असल्याने ‘इथेनॉल निर्यात धोरण’ तातडीने जाहीर करण्याची त्यांनी मागणी केली.