Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय अखेर शासनाकडे हस्तांतरित; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व स्थावर व जंगम मालमत्तेसह कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 10 जून 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केला आहे. सन 1983 पासून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी धाराशिव यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर तज्ज्ञ समितीची नियुक्ती करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला. मंत्रिमंडळाने 5 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत या हस्तांतरणास मंजुरी दिली. शासन निर्णयानुसार महाविद्यालयाची 7.13 हेक्टर जागा, इमारती व सर्व साहित्य विनामोबदला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच AICTE मानकांनुसार 300 प्रवेशक्षमतेसाठी एकूण 118 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळणार नसून ते मंदिर संस्थानचेच कर्मचारी राहणार आहेत. त्यांच्या वेतन, निवृत्तीवेतन व इतर सेवा लाभांची जबाबदारी संस्थानावरच राहणार आहे. भविष्यात रिक्त होणारी पदे शासनाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत. हस्तांतरणानंतर महाविद्यालयाचे नाव "श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर" असे करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या मालमत्ता हस्तांतरण, न्यायालयीन प्रकरणे, प्रलंबित देणी व इतर बाबींसाठी शासन आणि मंदिर संस्थान यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे. शासनाने संस्थानला पुढील सहा महिन्यांत इमारतींची दुरुस्ती, प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय साहित्य, विद्युत व्यवस्था तसेच प्रलंबित वेतन देयकांसह विविध कामांसाठी सुमारे 41.38 कोटी रुपयांचा खर्च करण्याचे बंधन घातले आहे. या खर्चाची संपूर्ण जबाबदारी संस्थानावर राहणार आहे. याशिवाय महाविद्यालयातील सध्या प्रलंबित असलेल्या 56 न्यायालयीन प्रकरणांमधून उद्भवणाऱ्या आर्थिक दायित्वाची जबाबदारीही संस्थानावरच राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. 'विकसित महाराष्ट्र 2047' या संकल्पनेनुसार महाविद्यालयात Artificial Intelligence, Data Science, Cyber Security, Green Technology, Renewable Energy आणि EV Technology यांसारखे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून तुळजापूरच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. #Tuljapur #EngineeringCollege #GovernmentEngineeringCollege #Tuljabhavani #Osmanabad #Dharashiv #HigherEducation #MaharashtraGovernment #TechnicalEducation #VeerMaharashtraNews #TuljapurNews #EducationNews #Marathwada #AICTE #EngineeringStudents

Tuljapur, Dharavshiv | Jun 11, 2026

MORE NEWS

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद 

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 12, 2026

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

Tuljapur, Dharavshiv | Jun 8, 2026

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या.

दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली.

या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे.

#तुळजापूर
#तीर्थबुद्रुक
#जिल्हाधिकारीदौरा
#कीर्तीकुमारपुजार
#धाराशिव
#ग्रामीणविकास
#प्रशासनगावाच्यादारी
#स्वच्छतामोहीम
#एकपेडमाँकेनाम
#वृक्षारोपण
#ग्रामविकास
#लोकसहभाग
#शासकीययोजना
#शिवारफेरी
#MaharashtraNews
#Tuljapur
#Dharashiv
#RuralDevelopment
#VeerMaharashtraNews
#NextFrameNews

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या. दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली. या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. "प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे. #तुळजापूर #तीर्थबुद्रुक #जिल्हाधिकारीदौरा #कीर्तीकुमारपुजार #धाराशिव #ग्रामीणविकास #प्रशासनगावाच्यादारी #स्वच्छतामोहीम #एकपेडमाँकेनाम #वृक्षारोपण #ग्रामविकास #लोकसहभाग #शासकीययोजना #शिवारफेरी #MaharashtraNews #Tuljapur #Dharashiv #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #NextFrameNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळ...

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार? प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळ...

Tuljapur, Dharavshiv | Jun 1, 2026

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय अखेर शासनाकडे हस्तांतरित; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व स्थावर व जंगम मालमत्तेसह कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 10 जून 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केला आहे. सन 1983 पासून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी धाराशिव यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर तज्ज्ञ समितीची नियुक्ती करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला. मंत्रिमंडळाने 5 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत या हस्तांतरणास मंजुरी दिली. शासन निर्णयानुसार महाविद्यालयाची 7.13 हेक्टर जागा, इमारती व सर्व साहित्य विनामोबदला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच AICTE मानकांनुसार 300 प्रवेशक्षमतेसाठी एकूण 118 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळणार नसून ते मंदिर संस्थानचेच कर्मचारी राहणार आहेत. त्यांच्या वेतन, निवृत्तीवेतन व इतर सेवा लाभांची जबाबदारी संस्थानावरच राहणार आहे. भविष्यात रिक्त होणारी पदे शासनाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत. हस्तांतरणानंतर महाविद्यालयाचे नाव "श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर" असे करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या मालमत्ता हस्तांतरण, न्यायालयीन प्रकरणे, प्रलंबित देणी व इतर बाबींसाठी शासन आणि मंदिर संस्थान यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे. शासनाने संस्थानला पुढील सहा महिन्यांत इमारतींची दुरुस्ती, प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय साहित्य, विद्युत व्यवस्था तसेच प्रलंबित वेतन देयकांसह विविध कामांसाठी सुमारे 41.38 कोटी रुपयांचा खर्च करण्याचे बंधन घातले आहे. या खर्चाची संपूर्ण जबाबदारी संस्थानावर राहणार आहे. याशिवाय महाविद्यालयातील सध्या प्रलंबित असलेल्या 56 न्यायालयीन प्रकरणांमधून उद्भवणाऱ्या आर्थिक दायित्वाची जबाबदारीही संस्थानावरच राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. 'विकसित महाराष्ट्र 2047' या संकल्पनेनुसार महाविद्यालयात Artificial Intelligence, Data Science, Cyber Security, Green Technology, Renewable Energy आणि EV Technology यांसारखे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून तुळजापूरच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. #Tuljapur #EngineeringCollege #GovernmentEngineeringCollege #Tuljabhavani #Osmanabad #Dharashiv #HigherEducation #MaharashtraGovernment #TechnicalEducation #VeerMaharashtraNews #TuljapurNews #EducationNews #Marathwada #AICTE #EngineeringStudents - Tuljapur News