नागपूर शहर: अथर्व अपहरण करून खून करणाऱ्या करणाऱ्या आरोपींना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
आठ एप्रिल ला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीतून हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेतून अथर्व नानोरे या अल्पवयीन मुलाचा अपहरण करून खून करण्यात आला होता त्याचा मृतदेह भरतवाडा परिसरात फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले आहे या आरोपींनी खंडणीसाठी अथर्वचे अपहरण करून खून केला. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.