ढेंगळी पिंपळगावात झालेल्या संवादादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हृदयातून उठलेली करुण हाक ऐकली. “आपली शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असा संदेश मा. उद्धवसाहेबांनी ढेंगळी पिंपळगावात दिला. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्या! माताभगिनींना धीर दिला. सरकारचं डोकं ठिकाणावर आणून आपणा सर्वांना शिवसेना भरीव मदत मिळवून देईल, हा विश्वास सर्वांना यावेळी दिला.