निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवरून वाद निर्माण झाला असून पराभूत उमेदवारांनी माध्यमांसमोर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीत गोंधळ झाला असून चुकीचा निकाल जाहीर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.