चाकणच्या उद्योगांना ‘धक्का’ बसणार? स्थलांतराच्या चर्चेवर उदय सामंत ॲक्शन मोडमध्ये!
चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा इतर जिल्ह्यांत स्थलांतरित होण्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
चाकण औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता चाकण येथे बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांचा संबंधित विभागांच्या समन्वयाने आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नयेत, चाकणमधील उद्योग आणि रोजगार टिकून राहावा, यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
❓ १६ ऑगस्टच्या बैठक
Pune City, Pune | Aug 13, 2026