लातूर: लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी पुरामुळे प्रचंड नुकसान ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा -आ.अमित देशमुख यांची शासनाकडे मागणी
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर – गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊन लातूर जिल्ह्यात ‘ओल्या दुष्काळाची’ परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर व आपत्तीग्रस्तांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांनी केली. असल्याची माहिती आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.