अलिबाग: वाढत्या उष्णतेमुळे रसाळ ताडगोळ्यांना पर्यटकांकडून मोठी मागणी
Alibag, Raigad | May 11, 2026 नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो. अलिबागमधील नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडगोळे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात या ताडगोळ्यापासून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. तसंच ताडगोळ्याचे अनेक फायदे असल्याने पर्यटक आणि नागरिकही याकडे आकर्षित होत आहेत. उष्णता वाढल्यामुळे ताडगोळ्यांना मागणी वाढली आहे.