अलिबाग: शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवा; कसूर करणाऱ्यांवर कारवाई
Alibag, Raigad | Apr 24, 2026 नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर रायगड जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी कृषी विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेत जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.