लातूर: जिल्हा बँकांच्या भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा माजी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर -राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या भूमिपूत्रांना संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसा निर्णय शासनाच्या सहकार विभागाने शुक्रवारी (दि. ३१) घेतला आहे. या शासन निर्णयापूर्वी भरती प्रक्रिया सुरु केलेल्या जिल्हा बँकांसाठीही हा निर्णय लागू होणार असून या भरतीतही स्थानिक उमेदवारांना ७० टक्के जागा राखीव असणार आहेत.