जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. विहिरीवर गेले असताना अचानक तोल जाऊन पडल्याने अनिल भिमसिंग राठोड (वय ४०) या शेतमजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता सुमारास समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.