नागपूर शहर: एनजीओमधील महिलांच्या विनयभंग आणि 'इस्लामीकरण' प्रकरणाने पेटले; विश्व हिंदू परिषदेची आक्रमक मागणी
शहरातील एका एनजीओमध्ये महिलांचा विनयभंग आणि धर्मांतराच्या (इस्लामीकरण) गंभीर आरोपांनी संपूर्ण नागपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी झोन-२ चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती करण्यात आली.