३ जानेवारीला बच्चू कडू यांचा आक्रोश मोर्चा अमरावती – शेतकरी नेते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी ३ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मीथूर येथून नागभीडपर्यंत आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांवर वाढलेल्या कर्जबाजारीपणामुळे किडनी विकण्याच्या घटना घडत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. हा “शेतकऱ्यांच्या किडनीचा हिशेब मागणारा मोर्चा” असेल, असे कडू यांनी स्पष्ट केले.