पनवेल: नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेला कत्तलखान्यांचा विळखा
Panvel, Raigad | Apr 3, 2026 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू होऊन 100 दिवस उलटले तरी हवाई सुरक्षेचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या उलवे परिसरात आजही उघड्यावर बकऱ्या आणि कोंबड्यांची कत्तल सुरू असल्याने बर्ड हिटचा (पक्षी धडक) धोका गंभीर झाला आहे. प्रशासनाच्या कागदोपत्री कारवाया आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी दरी असल्याचे ताशेरे पर्यावरण कार्यकर्त्यांनी ओढले आहेत.