दिग्रस शहरातील पाटील नगर येथील नागरिकांच्या वापरासाठी नगर परिषदने तब्बल ५० लाख रुपये खर्च करून सामाजिक सभागृहाचे बांधकाम केले होते. मात्र या सभागृहात तेजस्विनी जगताप यांनी केंद्र सुरू केला. सदर केंद्रात देणगी, आर्थिक व्यवहार व इतर कारणांवरून वाद निर्माण झाल्याने अखेर हे केंद्र बंद करण्यात आले. यानंतर या जागेचा धार्मिक किंवा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर होऊ नये, यासाठी पाटील नगर वासीयांनी नगर परिषदेला निवेदन देत सामाजिक सभागृहात सुरू असलेले गैरप्रकार तात्काळ थांबविण्याची मागणी केली होती.