वाशिम (दि.२४, जानेवारी): सध्या महाराष्ट्र राज्यात "अरुणोदय" सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविले जात आहे. सिकलसेल रक्तविकार वेळीच लक्षात आल्यास त्यावर उपचार करणे सोपे जाते, त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता रक्ताची चाचणी करून घ्यावी," असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी केले.