नाशिक जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘बालविवाह मुक्त भारत/महाराष्ट्र’ या 100 दिवसांच्या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बालविवाह प्रथा नष्ट करण्याची सामूहिक शपथ घेतली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, रुग्णायात.