मुरुड मध्ये दत्तमंदिर येथे झालेल्या सुशोभीकरण च्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत अजूनही काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती कोणी द्यायची, मुरूडकरांनी कोट्यवधींच्या कामाचे प्रयोजन काय? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाच्या ॲड मनिष माळी यांनी विचारला आहे आणि निवडणुकीला सर्व विकास कामं करणारे sub contractors व त्यांचे नातलग उभे असल्याचं सांगत यांना कशासाठी निवडून द्यायचं आहे हा एकदा विचार मुरुड च्या जनतेने करावा असे आवाहन देखील केले आहे