जळगाव तालुकयातील एका गावात राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलीला दि. 6 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहे. ही माहिती आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता मात्र झाली आहे