चंद्रपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान आणि उपचार रुग्णालय उभारले जात आहे. या मानवतावादी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पात उद्योगपती आणि थोर दानशूर व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे.खा.प्रतिभा धानोरकर यांनी या अत्याधुनिक रुग्णालयाला 'पद्मविभूषण स्व. रतन टाटा कॅन्सर रुग्णालय' असे नाव देण्याची मागणी आज दि 4 नोव्हेंबर ला 12 वाजता केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ही लोकहितकारी मागणी केली आहे.