अलिबाग: चौलमध्ये सुक्या चाऱ्याची भीषण टंचाई
Alibag, Raigad | Apr 4, 2026 अलिबाग तालुक्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि पर्यटन व्यवसायामुळे ओळख असली तरी येथील अनेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत शेती आणि पशुपालन आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुक्या चाऱ्याच्या भीषण टंचाईमुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे. सतत बदलणारे वातावरण, अवकाळी पाऊस आणि अनियमित हवामानामुळे चाऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, सध्या सुक्या चाऱ्याची तीव्र कमतरता जाणवत असून पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.