बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेले 'वंदे मातरम्' या गीतास ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिने महत्वाच्या घटनेच्या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'वंदे मातरम्' गीतगायन, देशभक्तिपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन व सांस्कृतिक कार्यक्रम यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.