धुळे शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात एनएचआयकडून सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. संथ कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या अडथळ्याचा फटका प्रवाशांसह स्थानिक नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. आर्थिक नुकसान होत असल्याने आणि वाहनधारक त्रस्त असल्याने दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.