नागपूर शहर: अथर्वच्या हत्येचा कट महिनाभरापूर्वीच; आरोपींच्या कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ, वकील संघटनेने दाखविली एकजूटता
अथर्व नानोरे अपहरण आणि हत्या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी जय यादव याने हत्येचा कट महिनाभरापूर्वीच रचला होता, तर गेल्या तीन महिन्यांपासून तो अथर्वच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.खंडणी मागण्यासाठी आरोपींनी बनावट नावावर सिमकार्ड आणि मोबाईल खरेदी केला होता. विशेष म्हणजे, खंडणीची रक्कम घेण्यासाठी त्यांनी 'पोर्टर' सेवेचा वापर करण्याचे नियोजन केले होते. जय यादव हा त्याच्या आईच्या प्रभावाखाली होता.