दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि.१७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. संदीप सदाशिव राठोड (वय २२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संदीप हा वडिलांच्या नावावर असलेली सुमारे पाच एकर शेती कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र गेल्या काही काळापासून सततची नापिकी आणि वाढते कर्ज यामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.