लातूर -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आपली ताकद दाखवून देईल. शरदचंद्र पवारांचा विचारच आम्हाला नेत्रदीपक यश मिळवून देणार असल्याचा विश्वास पक्षाचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी गुरुवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.