रत्नागिरी: वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन पोलीस चौकशीच्या फेऱ्यात
वाटद- खंडाळा परिसरातील तेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आता आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. या आधीच या प्रकरणातील हलगर्जीपणाच्या आरोपानंतर जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली होती. जर हे दोन कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.