राज्यात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना केवळ उपचारांचीच नव्हे, तर मानसिक आधार आणि वेदनामुक्तीची नितांत गरज असते. हीच गरज ओळखून आता जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात 'पॅलिएटीव्ह केअर' (पशामक उपचार) सेवा बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली