आज १६ डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांपासून विविध कृषी अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळण्यास विलंब लागत असल्याने अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी नुकत्याच झालेल्या राज्यविधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले. या लक्षवेधीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन राज्यातील दुष्काळीक्षेत्र तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने....