मतदार यादीत मोठी उलटापालट उघड झाली असून एका प्रभागातील हजारो नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची भेट घेऊन या गंभीर त्रुटीवर तातडीने दुरुस्तीची मागणी केली.प्रभाग १८ व न्यू प्रभात कॉलनीतील ४१० आणि ७४० मतदारांची नावे थेट प्रभाग २० मध्ये ‘शिफ्ट’ झाल्याचे उघडकीस आले.योग्य दुरुस्ती न झाल्यास मतदान प्रक्रियेवर परिणाम होईल,असा इशाराही भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांनी दिला आहे..