औंढा नागनाथ: सरकारच्या फसव्या पॅकेज विरोधात शेतकरी करणार काळी दिवाळी;राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून औंढा तहसील कार्यालय येथे निवेदन
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने राज्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात खरडून गेली तर घरे पडून, जनावरे दगावून मोठे नुकसान झाले आहे त्यातच राज्य सरकारने शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये दिल्याने या फसव्या पॅकेज विरोधात शेतकरी काळी दिवाळी साजरी करत असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने औंढा नागनाथ तहसील कार्यालयात दिनांक १७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी अडीचला दिले. निवेदनावर मुनीर पटेल सह अनेकांच्या स्वाक्षऱ्य आहेत