मालेगाव येथील प्रकरणावरील वक्तव्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेसंदर्भात औसा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. की, “विरोधकांनी कशावर काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे. संविधानाने हा अधिकार दिलेला आहे. लोकशाहीमध्ये टीका-टिप्पणी ही होतच असते. मी केवळ वस्तुस्थिती सांगतो.” ते पुढे म्हणाले की, “आरोप-प्रत्यारोपांना मी महत्त्व देत नाही.